BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

जाडेजा-सुंदरची शतकी भागीदारी: इंग्लंडचा माज लोळवला,

मँचेस्टर – जिंकलेली मॅच डोळ्यासमोरून निसटली तर काय होतं, हे इंग्लंडच्या संघाला समजून आलं. मँचेस्टर कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारताला पार कोसळवण्याचा इंग्लिश संघाचा माज चुरडून टाकत रविंद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या शतकी भागीदारीनं सामना ड्रॉ केला. विशेष म्हणजे सामना हातातून गेला असं वाटत असताना भारतानं संयम, डोळस खेळ आणि मनःशांतीच्या बळावर इंग्लंडला ‘पाणी पाजलं’.



पहिल्या डावात भारत ३५८ वर आटोपला. राहुल, जैस्वाल, सुदर्शन, पंत आणि ठाकूर यांनी कसाबसा स्कोअर उभा केला. स्टोक्स आणि आर्चरच्या भेदक माऱ्यानं भारताची अडचणीत भर घातली. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळेस मात्र परिस्थिती पूर्ण बदलली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवात खराब केली. क्रॉली, डकेट, पोपनंतर जो रूट आणि स्टोक्स यांनी भारंभार धावा कुटल्या. बुमराह, सिराज अपुरे पडत होते. सुंदरचा एकहाती प्रयत्न दिसत होता. अखेर जाडेजानं जो रूटचा काटा काढत इंग्लंडला पहिला धक्का दिला. स्टोक्सही तंबूत परतला.


इंग्लंडची डाव ६६९ वर आटोपली. भारतावर डावाने पिछाडी होती. दुसऱ्या डावात सुरुवातीच्या दोन विकेट्स ० धावांवर गेल्यावर भारत पुन्हा संकटात सापडला. पण राहुल-गिल जोडीने १८८ धावांची भागीदारी करून भारताला सावरलं. शतक पूर्ण करून राहुल बाद झाला आणि लगेचच गिलही तंबूत परतला.


२२२-४ अशी अवस्था असताना सामना पुन्हा इंग्लंडकडे झुकत होता. पण मग रंगात आले जाडेजा आणि सुंदर.


जाडेजाला रूटकडून एक कॅच मिळाला, पण तो सुटला आणि इंग्लंडच्या संघाचं नशिब तिथेच बुडालं. ५३ ओव्हरच्या प्रयत्नानंतरही जाडेजा-सुंदरची जोडी फुटली नाही. इंग्लंडचा माज चुरडला गेला. स्टोक्सनं पंचांकडे ड्रॉचा पर्याय मागितला पण जाडेजानं तो साफ नाकारला. शेवटी भारतानं हा सामना ड्रॉ करत मालिका पराभवापासून स्वतःला वाचवलं.


कसोटीतलं जाडेजाचं पाचवं शतक, तर सुंदरचं पहिलं कसोटी शतक ठरलं भारताच्या विजयासारखंच! सामना जिंकला नाही, पण पराभव टाळून भारतानं इंग्लंडला मैदानात नमवलं. 


थोडे नवीन जरा जुने