BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

माणुसकीचा चेहरा – रविदादा जावळे यांना वाढदिवसानिमित्त.

कोल्हापूर - या समाजात काही माणसं नुसती नावाने मोठी असतात. काहीजण पैशाने. पण काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, ज्यांचं मोठेपण त्यांच्या कर्तृत्वात, त्यागात आणि दिलेल्या माणुसकीच्या जिवंत उदाहरणांमध्ये दडलं असतं. अशाच एका निष्ठावान आणि कळकळीनं झिजणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आपण आज गौरव करत आहोत – माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि दादा जावळे.रवि दादांना ओळखणं म्हणजे केवळ त्यांचं नाव ओळखणं नव्हे. त्यांच्या आयुष्यातील लढाया, निराधारांसाठी केलेल्या झटणी, आणि समाजहितासाठीचे बिनीचे प्रयत्न ओळखणं हीच खरी ओळख. आज दादा वाढदिवस साजरा करत आहेत, पण त्यांचा एक एक दिवस हा इतरांसाठी समर्पित झालेला दिवस आहे.२०१८ सालच्या १९ फेब्रुवारीला, फक्त २२ तरुणांना सोबत घेऊन 'माणुसकी फाउंडेशन'ची स्थापना झाली. एक छोटीशी चळवळ होती – गरजूंसाठी, निराधारांसाठी, शिक्षणासाठी. पण या चळवळीला बळ दिलं रविदादांच्या विश्वासाने, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाने आणि नेतृत्वगुणांनी.रविदादांनी माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही उभं केलं आहे, ते केवळ एक NGO नाही. ती एक विचारधारा आहे – "कोणताही माणूस अडचणीत असू नये, कोणत्याही गरजूला मदतीपासून दूर राहावं लागू नये."आजही कोणत्याही रस्त्यावर एखादा निराधार दिसला, की रविदादा स्वतः तिथं पोहोचतात. त्याला अंघोळ घालतात, स्वच्छ कपडे घालतात, त्याच्या आत्मसन्मानाला धक्का न लावता, त्याला नवीन रूप देतात. हा प्रसंग ऐकला की वाटतं – कोण म्हणतं माणुसकी संपलीये?दादांनी केवळ मदतीचा हात दिला नाही, त्यांनी अशा हजारो निराधारांच्या आयुष्याला नवं वळण दिलं.रवि दादांचा सगळ्यात मोठा आणि लोकांना थेट भिडणारा कार्यभाग म्हणजे मोफत शिक्षण. गेली तब्बल २० वर्षं, दरवर्षी शेकडो मुलांना मोफत ऍडमिशन करून देणं ही एक परंपरा त्यांनी आपल्या जीवनात रुजवली आहे.कधी परिस्थिती नसते, कधी बापालाच रोजगार नसतो… अशा अनेक विद्यार्थ्यांना दादांनी त्यांच्या नावाने शिक्षणासाठी मदत केली.

  बघता बघता आज हेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीयर, शासकीय अधिकारी बनून समाजात मोठं स्थान मिळवत आहेत. आणि त्यांच्या यशामागे कायमचा उल्लेख होतो – "त्या वेळी जर रविदादांनी साथ दिली नसती, तर आज आम्ही इथं नसतो." माणूस कितीही मोठा असो, एक संघर्ष त्याच्या जीवनात असतो. रविदादांचा संघर्ष म्हणजे IGM हॉस्पिटलसाठी चाललेली लढाई.साल 2019-20 इचलकरंजीमधील IGM रुग्णालयाची अत्यंत वाईट अवस्था होती. रुग्णांना सुविधा नव्हत्या, स्वच्छता नव्हती, कर्मचारी कमी आणि प्रशासन उदासीन. तेव्हा रविदादांनी एक शपथ घेतली – "जोपर्यंत या रुग्णालयाचा कायापालट होत नाही, तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही."आज चार वर्षं झालीत. अजूनही दादा अनवाणी फिरत आहेत. आणि हे अनवाणी पाय समाजाच्या वेदनांवरून चालत आहेत. याच काळात IGM रुग्णालयात खूप सुधारणा झाल्या – तात्पुरत्या नव्हे, टिकणाऱ्या. त्या सुधारणा दादांच्या आंदोलनाचं फलित आहेत.करोना लॉकडाउन हे संपूर्ण जगासाठी काळं पर्व ठरलं. रोजगार गेले, अन्न-धान्य मिळेनासं झालं, रस्त्यावर माणसं उपाशी झोपली. पण अशाच वेळी रवी जावळे नावाचं एक व्यक्तिमत्त्व लोकांचं आश्रयस्थान बनलं.दररोज शेकडो कुटुंबांसाठी अन्नधान्य पोहोचवणं, गरजूंसाठी आरोग्य सेवा उभी करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीही एकटं पडू नये म्हणून २४ तास कार्यरत राहणं – हे दादांचं वैशिष्ट्य ठरलं.तेव्हा लोक म्हणायचे – "एक माणूस, पण शेकडो कुटुंबांचा आधार!"रविदादांचे काही शब्द कायम हृदयात कोरले जातात. एखाद्या कार्यक्रमाला दादा नाही गेले, तर लोक विचारतात – "दादा, यायला हवं होतं ना!""सुखात मी नसेन, हे खरं आहे. पण दुःखात तुम्ही मागे वळून पाहिलंत, तर माझं सावलीसारखं अस्तित्व तुम्हाला तुमच्या पुढे दिसेल."

हे शब्द केवळ ऐकायला चांगले वाटत नाहीत – हे शब्द दादांनी जगले आहेत, जपले आहेत आणि अनेकांना वाचवलं आहे.रविदादा केवळ माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष नाहीत, ते राज्य पातळीवर अनेक सामाजिक चळवळींचं नेतृत्व करत आले आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीत लोककल्याण आहे. त्यांनी कोणतीही 'पदं' मिळवण्यासाठी कार्य केलं नाही, पण लोकांनी त्यांना 'पदं' बहाल केलीत – प्रेमानं, विश्वासानं.

आजही फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो – मग तो अन्नदान असो, रक्तदान शिबिर असो, शिक्षणसहाय्य असो किंवा आपत्कालीन मदत.दादा केवळ एक सामाजिक कार्यकर्ता नाहीत. तरुणांच्या भाषा समजून घेणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, गरजूंना न बोलता मदत करणारे आणि समाजात माणुसकी जपणारे एक सर्वांगीण नेता आहेत.त्यांच्याभोवती एवढे तरुण का उभे राहतात? याचं उत्तर त्यांच्या कृतीत आहे. त्यांनी प्रत्येकाला 'स्वतःचं' वाटावं असं वागवलंय. आणि म्हणूनच दादा ‘लाखांचं नेतृत्व’ नसून, हृदयांचा सम्राट झालेत.

रविदादांसारखी माणसं समाजाला सुदैवानं लाभतात. पण त्यांना फक्त गौरवण्यात अर्थ नाही. त्यांच्या कार्याला हातभार लावणं, त्यांच्या ध्येयांना चालना देणं आणि त्यांच्यासारखीच विचारधारा आपल्या आयुष्यात रुजवणं, ही खरी श्रद्धांजली आहे.आज दादांचा वाढदिवस आहे. तो केवळ "केक" कापून साजरा होणार नाही. तो साजरा होईल जेव्हा कोणी गरीब पोटभर जेवेल, जेव्हा एखादं मूल शिक्षणासाठी रडणार नाही, जेव्हा एखाद्या आजारी माणसाला रुग्णालयात बेड मिळेल... तेव्हा.

शेवटचा शब्द...

रविदादा, आपण अनवाणी चालत राहिलात, पण समाजासाठी राजमार्ग तयार केलात.आपण निराधारांच्या सोबत उभे राहिलात, म्हणून हजारो कुटुंबं आजही आशेने जिवंत आहेत.आपण विद्यार्थ्यांना शिकवलं, म्हणून आज समाजात उद्याचे नेतृत्व उभं राहतंय.आपल्या ह्या माणुसकीच्या प्रवासाला माझं शतशः वंदन. वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा...!

(विशेष लेख पुष्पा पाटील - इचलकरंजी )

थोडे नवीन जरा जुने