BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

राजकारणाने दुरावलेले दोन शेतकरी नेते एकाच सोफ्यावर, पण संवाद नाहीच!

इंदापूर

शेतकरी चळवळीचे एकेकाळचे अग्रणी चेहरे आणि पूर्वीचे सवंगडी – राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत – आज पुन्हा एकदा एकत्र दिसले, मात्र केवळ दृश्यापुरते! इंदापूर न्यायालयाच्या वकिलांच्या बार रुममध्ये दोघे एकाच सोफ्यावर बसले खरे, पण दोघांच्यात संवादाचा साधा प्रयत्नही झाला नाही, नजरानजर टाळल्यासारखाच प्रकार संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला.


हे दोघेही शेतकरी आंदोलनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणात हजेरी लावण्यासाठी आले होते. जिथे कधीकाळी एकत्र लढणारे हे दोन चेहरे होते, तिथे आज शब्दांचीही देवाण-घेवाण झाली नाही. एकेकाळी ‘शेतकरी स्वाभिमान’ या एका छत्राखाली लढणारे हे दोघं आज राजकारणाच्या भिंतीमुळे पूर्णतः विभक्त झाल्याचं दृश्य स्पष्ट दिसून आलं.


प्रसारमाध्यमांनी दोघांची पुन्हा एकत्र येण्याबाबत विचारणा केली असता, राजू शेट्टी यांनी खोतांवर थेट ताशेरे ओढले.

> "सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात असेल, असं मला वाटत नाही,"अशा स्पष्ट शब्दांत शेट्टींनी खोतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


या दोघांमधील दुरावा २०१७ साली ठळकपणे समोर आला होता, जेव्हा सदाभाऊ खोत राज्याचे कृषी राज्यमंत्री असतानाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यावेळी संघटनेच्या निर्णय समितीने खोतांवर "संघटनेशी प्रामाणिक राहिलो नाहीत" असा ठपका ठेवत, त्यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्न उपस्थित केले होते.राजू शेट्टी यांनी त्या काळात सत्ताधाऱ्यांपासून फटकत घेतले, तर खोतांनी मात्र आपले मंत्रीपद कायम ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.


आजच्या या क्षणिक भेटीमुळे एक प्रश्न मात्र नव्याने समोर आला आहे.शेतकरी प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेत्यांना व्यक्तिगत व राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची वेळ आली आहे का?

इंदापूरच्या न्यायालयात घडलेली ही ‘शांत भेट’ अनेक अर्थांनी गूढ आणि प्रतीकात्मक ठरली. एकाच चळवळीतील दोन दिग्गज नेते – एकाच सोफ्यावर, पण भिन्न दिशांनी पाहताना – शेतकरी चळवळीतील विसंवाद आणि विभाजन अधोरेखित होतंय.एकत्र लढलेली स्वाभिमानाची लढाई आज ‘स्व’ केंद्रित राजकारणात हरवत चालली आहे का? – हाच खरा प्रश्न आजचा आहे.

थोडे नवीन जरा जुने