BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

परीख पूल उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार" – आमदार राजेश क्षीरसागर यांची ग्वाही

 कोल्हापूर | 28 जुलै 2025

कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. परीख पूल परिसरातील जर्जर स्थितीवर कायमचा उपाय म्हणून उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्याची ग्वाही आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.


दाभोळकर कॉर्नर ते पाचबंगला या मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ ते महामार्ग क्र.१६६ या रस्त्यांना जोडणारा नवीन पूल केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी सादर केला गेला आहे.


राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानांतर्गत, परीख पूल परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण आणि गटार निर्मितीच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कामासाठी ₹2 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


परीख पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, त्याच्या भिंती गळक्या व ठिसूळ झाल्या आहेत. पावसाळ्यात पुलाखालून सतत पाणी वाहत राहते, ज्यामुळे रस्ता खचतो आणि मोठमोठे खड्डे पडतात. वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच या मार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी उड्डाणपूल आवश्यक असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.


या उड्डाणपुलास परीख पुलाशी जोडणारा स्वतंत्र पूल तयार करावा, अशी मागणी २६ मे २०२५ रोजी ई-मेलद्वारे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. शासन सकारात्मक असून लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याचे आमदारांनी नमूद केले.


कार्यक्रमाला माजी पदाधिकारी, स्थानिक नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये राहुल चव्हाण, दीपक चव्हाण, रमेश पुरेकर, प्रकाश नाईकनवरे, अंकुश निपाणीकर, दुर्गेश लिंग्रस, आझम जमादार, कुलदीप देसाई, देवेंद्र खराडे, अभिजीत काशीद, शैलेश पाटील, सुमित साठम यांचा समावेश होता.

थोडे नवीन जरा जुने