BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापूर सीबीएस परिसरातील वाहतूक मार्गात बदल : २९ जून ते १३ जुलैपर्यंत प्रायोगिक निर्णय

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (CBS) परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शनिवारपासून (२९ जून) मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या आणि निघणाऱ्या एसटी बसांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल २९ जून ते १३ जुलै २०२४ दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे.



या अंतर्गत, पूर्वीच्या प्रवेशद्वाराचा वापर आता बसेस बाहेर पडण्यासाठी केला जाणार आहे, तर यापूर्वी ज्या गेटमधून बसेस बाहेर पडत होत्या, त्या गेटमधून आत प्रवेश केला जाणार आहे. यामुळे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

 या बदलाचा शहराच्या वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होईल का, याचा अंदाज घेण्यासाठीच ही चाचणी आणि पुढील १५ दिवसांचा प्रायोगिक कालावधी ठेवण्यात आला आहे.

नागरिकांच्या सूचना अपेक्षित

या कालावधीत स्थानिक नागरिक, एसटी प्रवासी आणि वाहनधारक यांनी नव्या वाहतूक व्यवस्थेबाबत आपले अनुभव, अडचणी व सूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे लेखी स्वरूपात अथवा फोनवर कळवाव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे. प्राप्त होणाऱ्या प्रतिक्रिया आणि अनुभवाच्या आधारे पुढील कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल.



हा बदल केवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांनी व वाहनधारकांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच स्थानिक पातळीवरील बदल समजून घेऊन वाहतूक नियमांचे पालन करावे, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने