BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापुरात वाढतोय प्लास्टिकचा साठा – पर्यावरण आणि आरोग्याच्या संकटाची घंटा

कोल्हापूर -"जिथे नाले, तिथे प्लास्टिक" – ही आता कोल्हापूर शहराची नवीन ओळख झाली आहे का?"शहराच्या गल्लीपासून मोठ्या मुख्य रस्त्यांपर्यंत, कोल्हापूरमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा साठा वाढत चालला आहे.दैनंदिन वापरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल, आणि पॅकिंग मटेरीयल्स हे सगळं अनियंत्रितरीत्या नाल्यांमध्ये, रस्त्यांवर, आणि सार्वजनिक जागांमध्ये दिसत आहे.


🧾 कोल्हापूर महापालिकेचे (KMC) आकडे काय सांगतात?

दररोज सुमारे 150 टन कचरा उचलला जातो

त्यातील 18 ते 25 टन प्लास्टिक कचरा असतो,पण यातील फक्त 30% प्लास्टिकचे पुनर्वापर केला जातो.

कोल्हापूरसारख्या शहरात जिथे महापुराचा वारंवार धोका असतो, तिथे प्लास्टिक साठ्यामुळे:गटारे तुंबतात,नाल्यांचा प्रवाह अडतो,आणि परिणामी रस्त्यांवर पाणी साचून पूरसदृश स्थिती निर्माण होते,प्लास्टिकमध्ये साचलेलं पाणी म्हणजे:डासांची उत्पत्ती,डेंग्यू, मलेरिया, आणि त्वचारोगांचं वाढलेलं प्रमाण,प्लास्टिक जाळल्यास हवेत घातक वायू (dioxins, furans)

नागरिक अनेकजण प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरतात,व्यापारी प्लास्टिकमध्ये माल पॅक करून विक्री करतात,प्रशासन बंदी असूनही अंमलबजावणीत हलगर्जी,जनजागृती कागदावर जास्त, कृतीत कमी.

प्रशासनाला आता काय करावे लागेल....

1. प्लास्टिक बंदीचं कडक अंमलबजावणी

2. पर्यायी उपाय – कापडी पिशव्या, ज्यूट बॅग

3. प्लास्टिक संकलन केंद्रांची वाढ

4. शाळा-हायस्कूलमध्ये जनजागृती

5. "My Area, My Cleanliness" अभियान

🔚 NewssKatta चं मत:

"विकास हवा, पण पर्यावरण संपवून नव्हे!"

कोल्हापूरच्या सुंदरतेचा भाग असलेली नद्या, रस्ते, मंदिरं प्लास्टिकमुळे विटाळली जात आहेत. यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनी सुद्धा सजग झालं पाहिजे.


📌 लेखक: NewssKatta टीम

🗓️ दिनांक: 26 जून 2024


थोडे नवीन जरा जुने